दिल्ली निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मिशन कमळ? शिवसेना की राष्ट्रवादीसोबत जायचं यावरुन मतभेद?

दिल्ली निवडणुकीनंतर भाजप नेतृत्वाच्या टार्गेटवर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन्ही राज्यातील गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी 'मिशन कमळ' पुन्हा सक्रिय होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यासाठी भाजप साम, दाम, दंड, भेद अशा सर्व शक्तींचा वापर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.